आमचे सरलेदिगर गावाविषयी माहिती
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर भात,नाचणी,कांदा,मका,बाजरी,सोयाबीन गहू व उडीद हि प्रमुख पिके घेतली जातात भात व कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते.
सरलेदिगर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत शेकडो कुटुंबांना घराचा लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सरलेदिगर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+)दर्जा मिळवला आहे.गावाच्या हद्दीत चणकापूर हा जलसंधारण प्रकल्प (धरण) बांधण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ४ सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वागीण विकास घडवून आणतात.ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
ग्रामपंचायत सरलेदिगर ला मिळालेले पुरस्कार:-
१)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०११/१२
२)तंटामुक्त पुरस्कार – २०१५/१६
३)टी.बी.मुक्त पुरस्कार -२०२३/२४






























































































